November 05, 2014

एक घाव दोन तुकडे...

व्यक्तिश: मला तरी शाटमारी असं वाटत नाही की सेनेने केलेली १० मंत्रीपदाची मागणी कमळी मान्य करेल..!

पण मला हेही कळत नाहीये की अजूनही सेनावाले वारंवार भाजपाशी हात मिळवण्याची स्वप्न का बघत आहेत..?

एक तर स्वबळावर लढून बहुमतच्या आसपासही नाही.. शिवाय भाजपाच्या तुलनेत फक्त अर्धे आमदार आले ही FACT आहे.. आणि दुसरं म्हणजे निवडणुकांपूर्वीच जी युती रीतसर तुटली आहे ती पुन्हा असं अर्ध्या आमदारांनिशी लाचार होऊन जोडण्यात काय अर्थ..?

मी पक्षप्रमुख असतो तर 'गाढवाच्या बोच्यात गेली ती सत्ता..जनतेचा कौल मान्य.. आम्ही विरोधात बसू..!' असं पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं असतं..!

५ वर्षांनी काही फरक पडत नाही.. पुन्हा नव्या जोमाने काम करू..पक्ष बांधू.. आई एकविरा पाठीशी आहेच..! असं सांगून मोकळा झालो असतो..!

बाळासाहेबांनी आम्हाला हाच बाणा शिकवला आहे.. परंतु सध्या उद्धव ठाकरेंचे हे जे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, हे एक जुना शिवसैनिक म्हणून निदान मला तरी पसंद नाही..

भले चूक असो की बरोबर.. एक घाव दोन तुकडे..हीच खरी आमच्या जुन्या शिवसेनेची ओळख..!
असो..

-- (कंटाळलेला) तात्या..

No comments: