March 13, 2008

शिंत्रेगुरुजी..२

शिंत्रेगुरुजी..

>>असं यजमानांनाच दरडावणारे नामजोशी गुरुजी! मग शिंत्रेगुरुजीच धंद्यात असे मागे का? इतके हडकुळे का?
काहीच कळत नव्हतं!<<

त्यानंतर -१० दिवसातच घडलेली एक घटना. आमच्या घराच्या मागच्या गल्लीत राहणारे कोठावळे आजोबावारले. म्हातारा तसा आजारीच असायचा. मिटलेन त्याने एकदाचे डोळे. मंडळी मर्तिकाच्या तयारीला लागली. मीतसा पट्टीचा मुडदेफरास. ताटी बांधण्यापासून ते लाकडावर ठेवण्यापर्यंत सगळ्या कामात तरबेज. कुणाच्यामर्तिकाची बातमी समजली, की विसरता एखादी ब्लेड खिशात टाकून घराबाहेर पडणारा. का? तर ताटी बांधतानासुंभ कापावा लागतो तेव्हा नेमकी ब्लेड लागते आणि तिथे नेमकं गाडं अडतं! असो..

'तात्या, स्मशानात गुरुजींना बोलवायचं तेवढं तुम्ही बघा!' अशी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. 'कुणालाबरं सांगावं?' असा विचार करत होतो तेवढ्यात शिंत्रेगुरुजींचं नांव सुचलं. लगेच मी त्यांच्या घरी गेलो, दार ठोठावलं.

शिंत्रेगुरुजींनीच दार उघडलं. 'अरे तात्या तुम्ही? या, बसा."

शिंत्रेगुरुजींचं घर अगदीच कळकट होतं. अनेक अनावश्यक असा जुन्यापान्या वस्तूंनी भरलेलं. भिंतींचा रंग साफउडालेला. घरभर एक कुबट्ट वातावरण!

"बोला, काय काम काढलंत?" शिंत्रेगुरुजी.

"अहो माझ्या ओळखीतले एक गृहस्थ थोड्या वेळापूर्वीच वारले. तासाभरातच त्यांना उचलायचं आहे. तुम्ही यालका स्मशानात मंत्राग्नी द्यायला?"

तेवढ्यात आतल्या खोलीतून भेसूर ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला. मला काही कळेचना. 'जराबसा हां, आलोच मी.' असं म्हणून शिंत्रेगुरुजी घाईघाईने आतल्या खोलीत गेले.

'अगं असं काय गं करतेस तू शकू? मी तुला पडून रहायला सांगितलं होतं की नाही? बरं नाही ना वाटत माझ्याबाळाला, ताप आला आहे ना? शाणी की नाही माझी बाळ ती? मग शांतपणे झोपून रहा बघू! आलोच हां मी. बाहेरपाहुणे आले आहेत ना आपल्याकडे राणी!'

असा संवाद मला आतल्या खोलीतून ऐकू आला. तेवढ्यात पुन्हा एकदा एक भेसूर आरोळी ऐकू आली! मला अगदीराहवेना म्हणून मी उठून आतल्या खोलीत डोकावलो. चौदा-पंधरा वर्षांची एक मुलगी खाटेवर बसली होती. बेढबशरीर, वेडेवाकडे दात, डोळ्यात काहीसे शून्य, काहीसे आकलन होत असल्याचे भाव. तोंडातून लाळ गळत होतीतिच्या. शिंत्रेगुरुजी तिला प्रेमाने थोपटत होते, शांत करत होते. तिची लाळ पुसत होते. ते अनपेक्षित दृश्य पाहूनसरसरून काटाच आला माझ्या अंगावर!

"तात्या, ही मुलगी माझी. काय नशीब पहा. मंदबुद्धी निपजली. चौदा वर्षांची आहे. आईही नाही बिचारीला.."

शिंत्रेगुरुजी मला माहिती पुरवत होते!

"शकू, नमस्कार कर पाहू काकांना! कसा करायचा नमस्कार? मी शिकवलाय की नाही तुला? काका आहेत ते. तुलाछान गोष्ट सांगतील, खाऊ देतील!शाणी की नाही आमची शकू? हसून दाखव पाहू काकांना!"

शकूने माझ्याकडे बघितलं. डोळ्यात अनोळखी भाव. किंचित वेडगळशी हसली. निष्पाप, निरागस! जरा वेळानेपुन्हा तसंच भेसूरसं ओरडली. तिचं ते रूप पाहून मला भडभडून आलं.

"आज हीचं जरा बिनसलंच आहे. तसं विशेष काही नाही हो. थोडा ताप, सर्दीखोकला आहे. औषधं घ्यायला नकोतहिला मुळीच." शिंत्रेगुरुजी सांगू लागले.

जरावेळाने शकू शांत झाली, तिला झोप लागली.

"या तात्या, बाहेरच्या खोलीत बसूया." आम्ही बाहेरच्या खोलीत आलो.

"बोला, काय काम काढलंत?"

"क्षमा करा गुरुजी, पण तुम्हाला अशी मुलगी आहे...." मी थोडा अडखळलो.

".....हे तुम्हाला माहीत नव्हतं, असंच ना?"

"हो, म्हणजे..." मी पुन्हा निरुत्तर.

"काय विशेष? कशाकरता आला होतात?" शिंत्रेगुरुजी.

शिंत्रेगुरुजींना बहुतेक शकूबद्दल माझ्याशी काहीच बोलायचं नव्हतं. मीही विषय वाढवला नाही. त्यांना कोठावळेआजोबा गेल्याची बातमी सांगितली. साधारणपणे त्यांना किती वाजता स्मशानात पोहोचावं लागेल तेही सांगितलं. त्यांनी यायचं कबूल केलं आणि मी तिथून निघालो.

कोठवळे आजोबांच्या मर्तिकाची सगळी तयारी झाली. येणारे सगळे आले, आणि आम्ही आजोबांचं मयत उचललं. स्मशानात शिंत्रेगुरुजी हजर होते. त्यांना पाहून मला पुन्हा एकदा शकूची आठवण झाली. शिंत्रेगुरुजी आत्ता इथेस्मशानात आहेत, 'मग घरी आजारी शकूपाशी कोण? शिंत्रेगुरुजींच्या गैरहजेरीत ती पुन्हा एकदा तसं भेसूर ओरडूलागली तर? कोण पाहील तिच्याकडे, तिची समजूत काढून कोण शांत करेल तिला?' असे अनेक प्रश्न माझ्यामनात येऊन गेले!

"गेले त्यांचं नांव काय? गोत्र कुठलं? गेले ते आपले वडीलच ना?..."

शिंरेगुरुजी कोठवळे आजोबांच्या मुलाला प्रश्न विचारत होते. मर्तिकाचे विधी सुरू झाले होते. थोड्याच वेळात रीतसरमंत्राग्नी मिळून कोठवळे म्हातारा पंचतत्त्वांत विलीन झाला!

काय दोन-चारशे रुपये दक्षिणा मिळाली असेल ती घेऊन शिंत्रेगुरुजीही घरी निघून गेले होते. माझ्या डोळ्यासमोरूनमात्र शकूचा तो निष्पाप, निरागस चेहरा जाईना. तिचं ते माझ्याकडे पाहून वेडगळसं हसणं मनांत घर करून गेलंमाझ्या!
घरी येऊन कोठवळे आजोबांच्या नांवाने अंघोळ केली.

काहीच सुचत नव्हतं. मतिमंद मुलं तशी अनेक असतात. पण शिंत्रेगुरुजींच्या घरी आलेला अनुभव अगदीअनपेक्षित होता. मला शकूला पुन्हा एकदा भेटावसं वाटत होतं. शिंत्रेगुरुजींना खूप काही विचारावसं वाटत होतं.

"हे काका खाऊ देतील तुला..."

शिंत्रेगुरुजींचं हे बोलणं मला आठवलं. तसाच उठलो. दुकानातून चांगलीशी मिठाई घेतली, आणि पुन्हा एकदाशिंत्रेगुरुजींच्या घरी पोहोचलो. दार ठोठावलं.

क्रमश:(अंतिम भाग- लवकरच.)

--तात्या.

शिंत्रेगुरुजी... १

राम राम मंडळी,
पटवर्धनांचं घर. एक नावाजलेलं घर. बडी मंडळी, पैसेवाली. गाडी, बंगला सगळ्याची अगदी रेलचेल. स्वत: दादापटवर्धन, दोन मुलं, सुना सगळी कर्तबगार मंडळी. स्वकष्टाने वरती आलेली. हे सगळं कुटुंबच्या कुटुंब माझं अशीलआहे. त्यांचे समभाग बाजारातील सर्व आर्थिक व्यवहार मी पाहतो. त्यामुळे कधी त्यांच्या हापिसात, तर कधीत्यांच्या घरी माझं येणंजाणं सुरूच असतं. त्या दिवशीही मी असाच काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो होतो.

तो सर्वपित्रि-अमावास्येचा दिवस होता. भाद्रपदातील अमावास्या. या दिवशी पितरमंडळी आपापल्या घरी जेवायलायेतात म्हणे. भाताची खीर, भाजणीचे वडे, गवार-भोपळ्याची भाजी, आमसुलाची चटणी असा जोरदार बेत असतोबऱ्याचशा घरांत. बरीच मंडळी या दिवशी श्राद्धपक्ष वगैरे करतात. ब्राह्मणभोजन घातलं जातं, दक्षिणा दिली जाते. माझ्यासारखे, जे काहीच करत नाहीत ते या दिवशी दुपारी बाराच्या सुमाराला कावळ्याला पान ठेवतात. पितरमंडळी कावळ्याच्या रुपात येऊन या बेतावर ताव मारतात आणि आपापल्या वंशजांना भरल्यापोटानेआशीर्वाद देऊन परत जातात! ;) असं म्हणे हो!

मी पटवर्धनांच्या घराची बेल वाजवली. स्वत: दादा पटवर्धनांनी दार उघडलं. दादा पटवर्धन. एक जंक्शन माणूस! 'अरे या तात्या. काय म्हणतांय तुमचं शेअरमार्केट? आमच्या नाड्या काय बाबा, तुमच्या हातात' असं नेहमीचंबोलणं दादांनी मिश्कीलपणे सुरू केलं. दादा सोवळ्यातच होते. उघडेबंब, गोरेपाऽन आणि देखणे. कपाळाला खास यादिवशी लावलं जाणारं गोपिचंद गंध लावलेलं! दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात श्राद्धविधीचा कार्यक्रम नुकताचआटपलेला दिसत होता. पिंडदानही झालं होतं. शिंत्रेगुरुजी श्राद्धाचं जेवायला बसले होते.

शिंत्रेगुरुजी!

एक हडकुळी व्यक्ती. पन्नाशीच्या पुढची. उभट चेहरा, अर्धवट पिकलेले केस. काही दात पडलेले, आणि जे होते तेपुढे आलेले. वर्ण मळकट काळा. मळकट धोतर नेसलेले, त्याहूनही मळकट जानवं. असा सगळा शिंत्रेगुरुजींचाअवतार.
या गुरुजी मंडळींचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे सत्यनारायण, लग्न-मुंज, इत्यादी शुभकार्ये करणारे, आणियांची दुसरी जमात म्हणजे मर्तिकं, श्राद्धपक्ष हे विधी करणारी. शिंत्रेगुरुजी दुसऱ्या जमातीतले. शिंत्रेगुरुजींशीमाझीही अनेक वर्षांपासून ओळख आहे. शिंत्रेगुरुजी आमच्याही घरी कधी श्राद्धपक्षाच्या निमित्ताने आले आहेत.

पटवर्धनांच्या घरी शिंत्रेगुरुजी मन लावून जेवत होते. त्यांची जेवायची पद्धतदेखील गलिच्छच. काही मंडळींना आधीजीभ पुढे काढून त्यावर घास ठेवायचा आणि मग जीभ आत घ्यायची, अशी सवय असते. शिंत्रेगुरुजीही त्यातलेच. हावऱ्या हावऱ्या जेवत होते. दुष्काळातून आल्यासारखे! मी पटवर्धनांच्या घरी पोहोचलो तेव्हा माझ्याकडे पाहून तेओळखीदाखल लाचार हसले होते. 'काय तात्या, कसं काय?' अशी माझी चौकशीही केली होती.

"वहिनी, थोडी खीर आणा बरं काऽऽ" असं त्यांनी म्हटलं आणि पटवर्धन वहिनींनी खीर वाढायला आणली.

"नाहीतर असं करा, थोडीशी डब्यातच द्या. घरी घेऊन जाईन!"

पटवर्धन वहिनींनी खिरीचा डबा भरला आणि शिंत्रेगुरुजींना दिला. पटवर्धन पती-पत्नींना काय हो, त्यांनाशिंत्रेगुरुजींना खीर बांधून देण्यात समाधानच होतं. आपल्या घरी आलेला ब्राह्मण जेवुनखाऊन तृप्त होऊन गेल्याशीकारण. त्या दिवसापुरता का होईना, त्यांच्या पितरांचाच प्रतिनिधी तो!

मला मात्र शिंत्रेगुरुजींचा रागही आला होता आणि दयाही आली होती!

एकीकडे माझं दादा पटवर्धनांशी कामासंबंधी बोलणं सुरू होतं. नेहमीचंच बोलणं. कुठले शेअर घेतले, कुठले विकलेयाबद्दलचा हिशेब मी त्यांना देत होतो. एकीकडे शिंत्रेगुरुजींचं जेवणही आटपत आलं होतं.दादांकडचं काम संपवूनमी निघालो. त्यांच्या घराबाहेर पडलो. समोरच पानवाला होता. म्हटलं जरा पान खावं म्हणून पानवाल्याच्यादुकानापाशी गेलो. तेवढ्यात शिंत्रेगुरुजीही विड्या घ्यायला तिथे आले. पटवर्धनांकडे एवढे टम्म जेवलेले असूनही तेहडकुळे आणि उपाशीच दिसत होते!

"काय गुरुजी, कुठली विडी घेणार?" मी.

"आपली नेहमीचीच. मोहिनी विडी!"

मी पानाचे आणि विड्यांचे पैसे दिले आणि तिथेच दोन मिनिटं पान चघळत घुटमळत उभा राहिलो. शिंत्रेगुरुजीहीआता सुखाने विडीचे झुरके घेऊ लागले. जरा वेळाने आम्ही दोघेही आपापल्या मार्गाने चालते झालो. मीदिवसभरातल्या इतर कामांच्या मागे लागलो, पण शिंत्रेगुरुजींचा विचार डोक्यातून जाईना! मी त्यांना गेली अनेकवर्ष हे असच पहात आलोय.

अहो अलीकडे मरणही महाग झालंय म्हणतात. कुणी मेला की नातेवाईकांना दिवसवारे करायचा खर्चही आताशाखूप येतो. पहिल्या दिवसाच्या मंत्राग्नी पासून ते तेराव्यापर्यंत दहा-बारा हजाराच्या घरात कंत्राट जातं म्हणतात. मर्तिकाची, श्राद्धापक्षाची कामे करणारी भिक्षुक मंडळी हल्ली 'शेठजी' झालेली मी पाहिली आहेत. मग आमचेशिंत्रेगुरुजीच असे मागे का? छ्या! शिंत्रे गुरुजींना धंदा जमलाच नाही. नाहीतर आमच्याच गावातले नामजोशीगुरुजी बघा! हातात तीन तीन अंगठ्या, गळ्यात चांगला जाडसर गोफ. पृथ्वीला लाजवील अशी ढेरी!

नामजोशी गुरुजींच्या घरी मर्तिकाचा निरोप घेऊन कुणी गेलं की,

'तेराव्या दिवसापर्यंतचं काम देता का बोला? तरच आत्ता स्मशानात येतो. आणि हो, इतके इतके पैसे होतील हो. नाही, आधीच सांगितलेलं बरं! अहो फुकटच्या अंघोळी कोण करणार?!'

असं यजमानांनाच दरडावणारे नामजोशी गुरुजी! मग शिंत्रेगुरुजीच धंद्यात असे मागे का? इतके हडकुळे का?

काहीच कळत नव्हतं!

क्रमश:

--तात्या अभ्यंकर.

March 11, 2008

नान्या..!

"तात्या, पोष्टाजवळचा टकल्या सातपुते खपला रे. वेळ असेल तर ये!"

रात्री अकराच्या सुमारास जरा कुठे डोळा लागतो लागतो तोच नान्याचा फोन!

शिवनाथ पांडुरंग नवाथे, ऊर्फ नाना नवाथे, ऊर्फ नान्या! हा प्राणी मला कधी भेटला, कधी आमची घट्ट दोस्तीजमली आणि कधी हा माझा झाला ते कळलंच नाही.

नान्याला मर्तिकं पोचवायची भारी हौस. छंदच म्हणा ना! जरा ओळखीपाळखीतलं कुणी मरायचा अवकाश, नान्यात्या घरात सर्वात पहिल्यांदा हजर! नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचाशो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो!

मग काय हो, ज्या घरी मयत झालेलं असेल त्या घरच्या मयताच्या तयारीचं पुढारीपण आपसुकच नान्याकडे येतंआणि नान्याच सगळी सूत्र हलवायला घेतो. कुठल्या स्मशानात जायचं, लाकडं की विद्युतदाहिनी, भटजी ठरवणे यासगळ्या गोष्टी नान्याच बघतो. हे नान्याला कुणी सांगायला लागत नाही आणि नान्या कुणी सांगण्याची वाटहीपाहात नाही. एकतर त्या घरची मंडळी हे सगळं ठरवायच्या मनस्थितीत नसतात, बरं मर्तिकातलं सगळंच काहीसगळ्यांना माहिती असतं असंही नव्हे. उलट कुठून सुरवात करायची, कुणी पुढाकार घ्यायचा हा जरा प्रश्नच असतो. आणि तिथे नेमका आमचा नान्या सगळी सूत्र हातात घेतो आणि मंडळी मनातल्या मनात हुश्श करतात!

"काय रे नान्या, तू एरवी जसा मोठमोठ्याने आणि भसाड्या आवजात बोलतोस तसाच मयताच्या घरीही बोलतोसका रे?" मी एकदा गंमतीत नान्याला विचारलं होतं!

"अर्रे! त्यावेळचा बोलण्याचा खास दबका आवाज आपण राखून ठेवला आहे!"

एखाद्या मुरब्बी नटाच्या थाटात नान्या उत्तरला!

नान्याचं बोलावणं आलं आणि मी चूपचाप टकल्या सातपुतेच्या घरी हजर झालो. टकल्या सातपुते त्याच्यानेहमीच्या खत्रूड चेहेर्यानिशीच घोंगडीवर विसावला होता. ‍

"बरं झालं तू आलास!" नान्याने मला हळूच एका कोपर्यात घेऊन म्हटलं.

"आयला, हा टकल्या सातपुते म्हणजे एक नंबरचा भिकारचोट माणूस! आयुष्यभर सगळ्यांशी तुसडेपणाने वागला. लेकाच्या मर्तिकाला कोण आलंय का बघ! अरे चार डोकी तरी हवीत ना मयताला? म्हणून मुद्दामच तुला बोलावूनघेतला. अरे चार माणसं जमवताना माझी कोण पंचाईत झाल्ये म्हणून सांगू! छ्य्या..!"

अर्थात, टकल्या सातपुतेच्या मयताला चार डोकी जमवायची जिम्मेदारी कुणीही नान्याकडे दिलेली नव्हती, तरहौशी नान्याने ती आपणहून अंगावर घेतली होती हे वेगळे सांगणे लगे!

"काय करणार काकू? आता जे झालं त्याला काय इलाज आहे सांगा पाहू! तुम्ही धीर सोडू नका. अहो मरण कायकुणाच्या हातात असतं का? बरं, वसू निघाल्ये का पुण्याहून? तुम्ही काही काळजी करू नका. मी आलोय ना आता, मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!"

नान्या टकल्या सातपुतेच्या बायकोला धीर देत होता. एकिकडे टकल्या सातपुतेला 'भिकारचोट' अशी माझ्याकडेखासगीत शिवी देणारा परंतु त्याच्या बायकोशी बोलताना मात्र, "काय करणार काकू, आता जे झालं त्याला कुणाचाकाही इलाज आहे का? मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!"असं बोलणार्या नान्याचं मला हसूही आलं आणिकौतुकही वाटलं! :) ‍

वास्तविक टकल्या सातपुतेला रात्री मुद्दाम उठून अगदी हटकून पोचवायला वगैरे जावं इतकी काही त्याची आणिमाझी घसट नव्हती. पण काय करणार, आमचे नान्यासाहेब पडले मर्तिकसम्राट! त्यांच्या दोस्तीखातर मला जावंलागलं होतं!

"अखेर टकल्या सातपुते अत्यंत गरीब परिस्थितीतच गेला रे!" नान्या पुन्हा एकदा दबक्या आवाजात हळहळला!

"गरीब परिस्थिती? अरे त्याचं हे घर तर चांगलं सधन दिसतंय. आणि मी तर अलिकडेच टकल्या सातपुतेला सॅन्ट्रोकारने जाताना-येताना पाहात होतो! मग टकल्या गरीब कसा काय? काय कर्जबिर्ज होतं की काय त्याच्याडोक्यावर?" मी.

"च्च! तसा गरीब नाही रे!" (बर्याचदा बोलण्याच्या सुरवातीला 'च्च' असा उच्चार करायची नान्याची खास ष्टाईलबरं का! :)

"पैशे खूप आहेत रे टकल्याकडे. पण आता तू बघतो आहेस ना? अरे चार डोकी तरी आपुलकीने, आस्थेने जमलीआहेत का त्याच्या मयताला? तुला सांगतो तात्या, माणूस गरीब की श्रीमंत हे तो मेल्यावरच समजतं! तशीपैशेवाल्यांच्या मर्तिकाला काही मंडळी स्वार्थापोटी जमतात, किंवा एखाद्या राजकारण्याच्या मर्तिकाला पुढे पुढेकरायला मिळावं म्हणून कार्यकर्तेही जमतात, तो भाग वेगळा! परंतु तुझ्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्यामयताला उत्स्फूर्तपणे चार माणसं जमतात आणि हळहळतात ना, ती खरी त्या माणसाची श्रीमंती समजावी!"

अच्छा! म्हणजे नान्या या अर्थाने टकल्या सातपुतेला गरीब ठरवत होता! माणसाला गरीब किंवा श्रीमंत ठरवायचानान्याचा हा निकष काही औरच होता!

"आता तुझ्या त्या देशपांडेचंच उदाहरण घे. तो खरा श्रीमंत! अगदी सामान्यातला सामान्य माणूस त्यालाआपुलकीने पोचवायला गेला होता!"

"कोण देशपांडे?" मी.

"अरे तुझा तो भाई देशपांडे रे!"

??

"अरे तुझा तो भाईकाका देशपांडे रे! टीव्हीवर शो करून सगळ्यांना हासवायचा ना? तो! काय गर्दी रे त्याच्यामयताला! टीव्हीवर दाखवत होते ना!"

मी मनातल्या मनात भाईकाकांची त्यांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागितली आणि म्हटलं, "भाईकाका, आमच्या नान्याला एकेरी उल्लेखाबद्दल मोठ्या मनाने क्षमा करा. मनानं तसा निर्मळ आहे तो. तुमच्या अंतयात्रेलाझालेल्या उत्स्फूर्त गर्दीवरून तो तुम्हाला श्रीमंत ठरवतोय! तुमच्यातल्या माणूसवेडाला ही त्याची दाद समजा!"

एका बाबतीत मात्र नान्या खरंच सुखी होता. त्याला संगीत, कला, साहित्य वगैरे कश्शाकश्शात इंटरेस्ट नव्हता! पुलंनादेखील तो लेखक वगैरेच्या ऐवजी, 'टीव्हीवर ते कार्यक्रम करायचे' इतपतच ओळखत होता!

"हॅलो, कोण टिल्लूगुरुजी का? मी नाना नवाथे बोलतोय. पोष्टाजवळचे सातपुते वारले. तुम्ही अमूक अमूक वाजताडायरेक्ट स्मशानात पोहोचा. आम्ही त्याच सुमारास मयत घेऊन तिकडे येऊ!"

नान्या आता पुढच्या उद्योगाला लागला होता. नान्याची फोन डायरी जर तपासली असती तर त्यात मर्तिकाची कामंकरणार्या किमान पाचपन्नास भटजींची नांवं तरी सहज सापडली असती! :) ‍

"काय करणार तात्या, अरे ऐनवेळेस लोकांना भटजी कुठून बोलवायचा, कुणी बोलवायचा, कोण कोण भटजी अशीकामं करतात हे देखील माहीत नसतं! त्यामुळे साला मला या भटजी मंडळींशी कॉन्टॅक्टस् ठेवावे लागतात!"

एखाद्या गब्बर बिल्डरचे जसे महापालिका आयुक्त, नगरसेवक वगैरे मंडळींशी कॉन्टॅक्टस् असतात त्याच थाटातनान्या मर्तिकाच्या भटजींशी आपले कॉन्टॅक्टस् आहेत हे सांगत होता!

अंगापिंडाने काटक-सडपातळ, उभेल्या चेहेर्याचा, रंगाने सावळा, नाकीडोळी चांगला तरतरीत स्मार्ट, मध्यमउंचीचा, नेहमी साध्या शर्ट प्यँटीत असलेला नान्या गावात मुडदेफरास म्हणून प्रसिद्ध आहे. नान्या रेल्वेतइलेक्ट्रिकल कामगार या पदावर नोकरीला आहे. प्रसन्न चेहेर्याची, वृत्तीने अत्यंत समाधानी अशी पत्नी नान्यालालाभली आहे. तिचं नांव सुधा. नान्या तीन मुलींचा बाप आहे. सर्वात धाकटी स्नेहा आता - वर्षांची आहे. मी तिलाचिऊ म्हणतो. कधीही नान्याच्या घरी जा, आमची चिऊ जिथे असेल तिथनं भुर्रकन येऊन तात्याकाकाला येऊनबिलगते!‍ ‍

"गधडे, तू तात्याकाकाकडेच राहिला जा! तोच तुझं कन्यादान करील!" असं नान्या चिऊला म्हणतो! :)

नान्याचं सगळं घरच अगदी प्रसन्न आणि हसतमुख चेहेर्याचं आहे. रेल्वेची नोकरी सांभाळून नान्या घरगुतीइलेक्ट्रिक वायरींग दुरुस्तीची वगैरे कामही कामं घेतो. भरपूर कष्ट करतो. बायकोमुलींवर बाकी नान्याचा भलताचजीव! अत्यंत कुटुंबवत्सल स्वभाव आहे नान्याचा.

पण नान्याचा आवडीचा छंद किंवा विरंगुळा मात्र एकच. तो म्हणजे लोकांच्या मर्तिकाला जाणे! :) नान्या एकवेळकुणाच्या लग्नामुंजीला जायचा नाही, पण ओळखीत कुठे मर्तिक असल्याचं कळलं की सर्वात पहिला नान्या हजर! मग अगदी शेवटपर्यंत तिथे थांबणार. अगदी सामान आणण्यापासून ते तिरडी बांधण्यापर्यंत, डॉक्टरचं सर्टिफिकेट, स्मशानात सुपूर्द करायची कागदपत्र, लाकडं रचणार्या इसमाशी "काय रे बाबा, लाकडं ओली नाहीत ना? मीठआणि रॉकेल आहे ना?" इत्यादी गोष्टी कम्युनिकेट करणे, पळीपात्र, काळे तीळ, दर्भ, इथपासून भटजींच्यासामानाची अप्टुडेट तयारी करणे या सगळ्यात नान्याचं हात धरणारं गावात दुसरं कुणी नाही!

गणपतीच्या दिवसात नान्याकडे खरी धमाल असते. नान्याकडे पाच दिवसांचा गणपती बसतो.

"अरे तात्या, तुझं ते भजनीमंडळ घेऊन गणपतीत अमूक अमूक दिवशी माझ्या घरी ये रे. मस्तपैकी गाण्याचाकार्यक्रम करू!"

वास्तविक नान्याला संगीताचीही फारशी काही समज किंवा आवड नाही, पण गणपतीत घरी गाण्याचा कार्यक्रमझालाच पाहिजे ही हौस मात्र दांडगी! दरवर्षी नान्याच्या घरी माझं गाणं ठरलेलं, कारण मीच काय तो एकमेव गायकनान्याच्या ओळखीचा! पण मला खरंच कौतुक वाटतं नान्याचं. त्याच्या त्या दोन खोल्यांच्या रेल्वे क्वार्टर्समध्येपाचपंचवीस माणसं गाणं एकायला अगदी दरवर्षी जमतात. ही सगळी नान्याच्या गणगोतातली माणसं! मलाअभिमन वाटतो की मी देखील नान्याच्या गणगोतातीलच एक आहे!

गणपतीत दरवर्षी ठरल्याप्रमाणे मी माझा तब्बलजी आणि पेटीवाला घेऊन नान्याच्या घरी हजर होतो. नान्यातेव्हा कोण मुलखाच्या गडबडीत असतो! मग त्यानंतर अगदी यथास्थित, पाय दुखेस्तोवर अर्धापाऊण तासआरती! आरती झाली की गणपती बाप्पा मोरया या आरोळी पाठोपाठच, "देवा गणपतीराया सगळ्यांना मुक्ति मिळूदे रे बाबा! कुणाचा जीव तरंगत रहायला नको!" हे देखील नान्या ओरडतो! :)

छ्या! या नान्याचं मर्तिकाचं खूळ केव्हा जाणारे कुणास ठाऊक! गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रेबाबा!" या आरोळीच्या रुपाने ते खूळ नान्याच्या पायात पाय घालायला येतंच तिच्यायला! ते सुद्धा नान्याच्यानकळत! कारण आपण असं काही बोललो हे देखील नान्याच्या गावी नसतं! :) मला तर एखाद् वर्षी "देवागणपतीराया, या वर्षी लाकडं जरा स्वस्त होऊ देत रे बाबा!" असंही नान्या ओरडेल की काय अशी भिती वाटते! :))

"हं तात्या, इथे सतरंजी घातल्ये. तुम्ही मंडळी इथे बसा आणि सुरू करा गाणं! मंडळी, सर्वांनी बसून घ्या रे. आतागाणं ऐकायचंय! सुधा, खिचडीच्या प्लेटा भरल्यास का?" नान्याची तोंडपाटिलकी सुरूच असते!

"तात्या, काय सुपारी-तंबाखू, पानबिन हवं तर सांग रे. लेका मोठा गवई तू!" एवढं म्हणून नान्या पुन्हा इतरलोकांच्यात कुणाला काय हवं नको ते पाहायला मिसळतो! मग मी आणि माझी साथीदार त्या गर्दीतच स्थानापन्नहोऊन वाद्यबिद्य जुळवू लागतो. कुठलीही औपचारिकता वगैरे पाळता नान्या मला हुकून सोडतो,

"सुरू कर रे तात्या. तुझं ते 'जो भजे हरि को सदा' होऊन जाऊ दे जोरदार!"

मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :)

मग मी देखील नान्याच्या घरी अगदी मन लावून, यथेच्छ गातो. तसा काही मी कुणी मोठा गवई नव्हे. बाथरूमसिंगरच म्हणा ना! पण नान्याच्या घरी गायला जी मजा येते ती कुठेच येत नाही! देव आहे की नाही हे मला माहितीनाही, पण नान्याच्या घरी गाताना मात्र मला इश्वरी वास जाणवतो!

बरं एवढं करून देखील नान्या तिथे गाणं ऐकायला थोडाच थांबेल? ते नाही! तो लगेच आलेल्या मंडळींना गरमागरमसाबुदाण्याची खिचडी आणि उत्तम मावा बर्फीचा तुकडा असलेली प्लेट द्यायला उठणार! नान्या, त्याची तीप्रसन्नमुखी बायको सुधा, आणि तीन निरागस मुली सगळ्यांच्या सरबराईत लागलेल्या असतात. गातांना मध्येचधाकटी चिऊ माझ्या मांडीवर येऊन बसणार! "तात्याकाका, मी पण गाणार!" असं मला म्हणणार! :)

"खरंच रे तात्या, चिऊला गाणं शिकवण्याकरता लेका मी तुझ्याचकडे पाठवणार आहे. तिला आपण मोठ्ठी गायिकाकरूया!" नान्या हे सांगत असताना सुधावहिनीही कौतुकाने चिऊकडे बघणार! मंडळी, खरंच किती साधी माणसंआहेत ही! नान्याच्या घरची गणपती मूर्ती जशी प्रसन्न दिसते तशी कुठलीच मूर्ती मला दिसत नाही! अहो देवसुद्धाशेवटी निरागसतेचा, साधेपणाचाच भुकेला आहे!

पण मंडळी, एका बाबतीत मात्र मी नान्याचा नेहमीच धसका घेतलेला आहे!

अहो काय सांगावं, रात्री अपरात्री कधीही नान्याचा फोन यायची भिती असते,

"तात्या अमका अमका खपला रे तिच्यायला! मोकळा असशील तर ये! अरे मयताला चार डोकी तरी जमवायलाहवीत ना!"

-- तात्या अभ्यंकर.

हाच लेख येथेही वाचता येईल...